सदस्य चर्चा:Imtiyaz Shaikh
मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ )
[संपादन]
.
|
|
मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ )
[संपादन]
|
|
|
![]() |
इम्तियाझ शेख, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
इम्तियाझ शेख, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९७,०३१ लेख आहे व १३४ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती ![]()
आपणास विकिपीडियावर तांत्रिक गोष्टी कठीण जातात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
इस्लाम हे अशा एखाद्या जीवन पद्धतीचे नाव नाही ज्यास प्रेषित मुहम्मद (स.) यांनी प्रथम सादर केली म्हणून त्यांना इस्लामचे संस्थापक समजणे योग्य नाही. पवित्र कुरआन या सत्याचे स्पष्टीकरण करीत आहे की, परमेश्वराने मानवजातीसाठी नेहमी एकच जीवन पद्धती पाठविली आणि ती म्हणजे इस्लाम ! अल्लाहसमोर आज्ञाधारकता स्वीकारुन नतमस्तक होणे म्हणजे इस्लाम ! निरनिराळ्या भागात व निरनिराळ्या समाजामध्ये परमेश्वराकडून जे प्रेषित पाठविण्यात आले होते ते वेगवेगळ्या जीवन पद्धतीचे संस्थापक नव्हते आणि म्हणून त्यांनी आणलेल्या जीवनपद्धतीला त्यांच्या नावावरून ओळखले जाऊ शकत नाही. प्रत्येक येणार्या पैगंबराने ह्याच एका जीवन पद्धतीला सादर केले, जिला त्यांच्यापूर्वी आलेले पैगंबर सादर करीत आले होते.
पैगंबरामध्ये प्रेषित मुहम्मद (स.) यांचे वैशिष्ट्य वस्तुतः हे आहे की,
ते अल्लाहचे शेवटचे पैगंबर (प्रेषित) आहेत.
त्यांच्याद्वारे अल्लाहने सर्व पैगंबरांनी आणलेल्या मूळ जीवनपद्धतीलाच पुन्हा ताजे केले.
या जीवन पद्धतीमध्ये निरनिराळ्या काळातील लोकांनी अदलाबदल करून निरनिराळे धर्म बनविले होते. अल्लाहने त्या सर्व फेरफारांना दूर केले आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याद्वारे मानवजातीला खर्या व शुद्ध इस्लामची शिकवण दिली.
परमेश्वराला त्यांच्यानंतर पुन्हा प्रेषित पाठविणे शक्य नव्हते म्हणून त्यांना ग्रंथ देण्यात आला. त्यापासून माणसाला प्रत्येक काळात मार्गदर्शन प्राप्त करता यावे या हेतून त्या ग्रंथाचा शब्दन् शब्द मूळ भाषेत सुरक्षित करण्यात आला. प्रेषित (स.) यांनी जे पवित्र कुरआन सादर केले तेच पवित्र कुरआन कसल्याही प्रकारच्या फेरबदलाशिवाय आजही आपल्या मूळ स्वरूपात अस्तित्वात आहे व राहील, यात थोडा देखील संदेह नाही. ह्या ग्रंथाचे जसजसे अवतरण होत असे, ते लिहून ठेवण्याची व्यवस्था पैगंबरानी केली. हा क्रम त्यांच्या निधनापर्यंत चालू होता. या संपूर्ण कुरआनला पहिले खलिफा अबू बकर (र.) यांनी एका ग्रंथाच्या स्वरूपात लिहून घेऊन सुरक्षित केले. त्यानंतर तिसरे खलिफा प्रेषित उस्मान (स.) यांनी त्याच्या प्रती काढून त्या इस्लामी जगताच्या सर्व केद्रांना पाठविल्या. त्या वेळेपासून आजपावेतो प्रत्येक देशातील व प्रत्येक शतकातील प्रसिद्ध झालेल्या व लिहून ठेवण्यात आलेल्या कुरआनच्या प्रतींना एकत्र करून तपासले गेले तर त्यांच्यामध्ये किचित देखील फरक आढळून येणार नाही. याशिवाय नमाजमध्ये कुरआनचे पठन करण्याची आज्ञा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरीच्या पहिल्या दिवसापासूनच दिली गेली होती. शेकडो सहाबा (सहकारी) नी संपूर्ण कुरआनचे आणि सर्व सहाबांनी कोणत्या ना कोणत्या भागाचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनकालातच पाठांतर केलेले होते. त्या वेळेपासून आजपर्यंत, संपूर्ण कुरआन पाठ करण्याचा आणि दरवर्षी रमजान महिन्यामधील तरावीहच्या नमाजमध्ये ते तोंडपाठ ऐकविण्याचा क्रम सार्या इस्लामी जगतात चालत आलेला आहे आणि प्रत्येक काळात लाखो हाफिज (संपूर्ण कुरान मुखोद्गत असलेले लोक) झालेले आहेत. जगातील दुसरा कोणताही धार्मिक ग्रंथ अशाप्रकारे लिखाणाच्या आणि पाठांतराच्या स्वरूपात सुरक्षित राहिलेला नाही.
त्यांचे चरित्र व त्यांची आचरणपद्धती (सुन्नत) त्यांच्या साहाबांनी आणि नंतरच्या हदीस (पैगंबराचे वचन व आचरण) संग्राहकांनी अनुपम पद्धतीने सुरक्षित करून ठेवले आहे, ह्यापेक्षा अधिक सुरक्षित पद्धतीने केव्हाही, कोणाही पैगंबराच्या अगर ऐतिहासिक पुरुषाच्या जीवनातील घडामोडी, त्यांची वचने व आचरण सुरक्षित केले गेलेले नाहीत. थोडक्यात ती पद्धत अशी होती जेव्हा एखादा माणूस प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासंबंधी एखादी गोष्ट सांगे तेव्हा त्याला अनिवार्यपणे ती गोष्ट त्याच्यापर्यंत कोणकोणत्या निवेदकामार्फत पोहोचली होती ? निवेदनाचा हा क्रम अशा एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो किवा नाही ? त्याने स्वतः ती गोष्ट पैगंबरांच्या तोंडून ऐकली आहे किवा ती गोष्ट पैगंबर करताना त्याने स्वतः पाहिले आहे याचा हवाला द्यावा लागत असे. ज्या ज्या निवेदकांमार्फत हे निवेदन नंतरच्या लोकांपर्यंत पोहोचले, त्यांचे निवेदन विश्वासपात्र आहे किवा नाही हे पाहण्यासाठी त्यांच्या जीवनचारित्र्याची तपासणी करण्यात आली. याप्रकारे हदीसचे संग्रह तयार करण्यात आले. संग्राहकांनी प्रत्येक हदीसच्या सुरुवातीस त्या हदीसच्या निवेदकांचा पूर्ण क्रम नमूद केला आणि याबरोबर निवेदकांच्या जीवनावरही पुस्तके लिहिली गेली. त्यांच्या साहाय्याने आजही आम्ही याचा शोध घेऊ शकतो की प्रेषित मुहम्मद (स.) यांचे जीवन कसे होते आणि त्यांनी आपल्या उक्ती व कृतीने लोकांना काय शिकवण दिली आहे.
अशा प्रकारे पवित्र कुरआन आणि ते आणणार्या पैगंबराचे प्रमाणित चरित्र व सुन्नत या दोन्ही गोष्टी मिळून परमेश्वराची जीवनपद्धती खरोखरच काय आहे ? कोणते मार्गदर्शन ती करीत आहे ? आणि आमच्यापासून ती काय इच्छित आहे ? हे जाणून घेण्याचे ते एकमेव विश्वासपात्र साधन झाले आहे.
आम्ही प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्व पैगंबरांवर ईमान आणतो. ज्या पैगंबरांचा उल्लेख पवित्र कुरआनमध्ये आहे त्याच्यावरही आणि ज्यांचा उल्लेख त्यामध्ये नाही त्यांच्यावरही हे ईमान आमच्या निष्ठेचा आवश्यक असा भाग आहे. या ईमानाशिवाय आम्ही मुसलमान राहूच शकत नाही. परंतु मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आम्ही फक्त प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडेच वळतो. असे आम्ही कोणत्याही पूर्वग्रहांमुळे करीत नाही तर वास्तविक त्याची कारणे अनेक आहेत.
ते अल्लाहचे शेवटचे पैगंबर आहेत आणि म्हणून त्यांनी आणलेली शिकवण, अल्लाहचे शेवटचे व अद्ययावत मार्गदर्शन आहे.
त्यांच्यामार्फत आमच्यापर्यंत अल्लाहचा जो शब्द पोहोचला आहे तो अल्लाहचा शुद्ध शब्द आहे. त्याबरोबर कोणत्याही मानवी शब्दाची भेसळ झालेली नाही. तो आपल्या मूळ भाषेत सुरक्षित आहे. त्याची भाषा एक जीवंत भाषा आहे. ती भाषा आजही कोट्यावधी लोक बोलतात, लिहितात व समजतात आणि त्या भाषेचे व्याकरण, शब्दकोश, वाक्प्रचार, उच्चार व शुद्धलेखन यांच्यामध्ये पवित्र कुरआनच्या अवतरण काळापासून आजतागायत कोणतेही परिवर्तन झालेले नाही.
आताच सांगितल्याप्रमाणे त्यांचे चरित्र, त्यांचा स्वभाव, त्यांचे आचरण, त्यांची उक्ती व कृतीसंबंधी ऐतिहासिक रेकॉर्ड सुरक्षित आहे हे रेकॉर्ड शक्यतेच्या मर्यादेपर्यंत अधिकाधिक शुद्ध आणि शक्य तितक्या अधिकाधिक तपशिलासह आहे. ही स्थिती दुसर्या पैगंबराच्या बाबतीत नसल्याने आम्ही त्याच्यावर फक्त ईमान आणू शकतो पण प्रत्यक्षपणे त्यांचे अनुकरण करू शकत नाही.
आमच्या निष्ठेनुसार प्रेषित मुहम्मद (स.) यांचे प्रेषितत्व सार्या जगासाठी व प्रत्येक काळासाठी आहे कारण
पवित्र कुरआन तसे सांगत आहे.
ते शेवटचे प्रेषित आहेत या वस्तुस्थितीची ही तर्कसंगत निकड आहे. एखादा प्रेषित जेव्हा शेवटचा प्रेषित म्हणून येतो तेव्हा आपोआपच हे सिद्ध होते की, तो त्याच्या व त्यांच्या नंतरच्या काळासाठी नेता व मार्गदर्शक असतो.
त्यांच्यामार्फत ती शिकवण संपूर्णपणे देण्यात आली जी सरळ मार्गावर आचरण करण्यासाठी माणसाला आवश्यक आहे. ही पण ते शेवटचे प्रेषित आहेत याची तर्कसंगत निष्पत्ती आहे. कारण शिकवणी शिवाय जो प्रेषितही पाठविला जाईल, तो शेवटचा प्रेषित होऊ शकत नाही. त्याच्यानंतर आणखीन एका प्रेषिताची आवश्यकता असते.
हे एक सत्य आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यानंतर गेल्या चौदाशे वर्षात आपण परमेश्वराकडून आलेलो आहोत असा दावा करणारी, जिच्या चरित्र व स्वभाव आणि उक्ती व कृतीमध्ये पैगंबरांशी किचित देखील साम्य असणारी, आपणावर ईश्वराचे आदेश उतरतात असा दावा करून ईश्वरी ग्रंथाशी नाममात्र का होईना सादृश्य असणारा एखादा ग्रंथ सादर करणारी आणि ज्याला शरीअत-कायदा देणारा प्रेषित म्हणता येईल अशी व्यक्ती जन्मास आलेली नाही.
याठिकाणी हे जाणून घेणे आवश्यक आहे की, परमेश्वराकडून मानवाला त्या कोणत्या खास ज्ञानाची आवश्यकता आहे जे फक्त प्रेषितांच्या द्वारे दिले गेले आहे ?
जगामध्ये एक प्रकारच्या अशा वस्तू आहेत ज्यांना आम्ही आमच्या ज्ञानेंद्रियांमार्फत जाणतो अगर शास्त्रीय उपकरणे वापरून त्यांच्याकडून माहिती मिळवू शकतो. अशाप्रकारे मिळणारी माहिती निरीक्षण, प्रयोग, विचार व युक्तीवाद यांच्या साहाय्याने क्रमबद्ध करून नव्या नव्या परिणामापर्यंत पोहोचू शकतो. अशा वस्तूचे ज्ञान परमेश्वराकडून यावयाची आवश्यकता नाही. हे आमच्या स्वतःच्या शोध, प्रयत्न व चितन-मननाचे क्षेत्र आहे. तरीपण या बाबतीतही आमच्या निर्मात्याने आम्हाला अगदी वार्यावर सोडून दिलेले नाही. निरनिराळ्या काळात अगम्य पद्धतीने एका ठराविक क्रमानुसार आपल्या निर्माण केलेल्या जगाशी तो आमचा परिचय घडवीत आला आहे. ज्ञानाचे मार्ग आमच्यासाठी खुले करीत आला आहे. आणि वेळोवेळी प्रेरणेद्वारे कोणत्या ना कोणत्या माणसाला अशी एखादी गोष्ट सुचवीत असतो, ज्याद्वारे तो माणूस एखादा नवा शोध अगर एखादा नवा नैसर्गिक नियम प्रस्थापित करतो. असे असले तरी वास्तविक हे मानवी ज्ञानाचेच क्षेत्र आहे. त्याच्यासाठी ईश्वराकडून एखादा प्रेषित अगर ग्रंथ येण्याची आवश्यकता नाही. या क्षेत्रात ज्या माहितीची आवश्यकता आहे ती प्राप्त करण्याची साधने माणसाला दिली गेली आहेत.
दुसर्या प्रकारच्या वस्तू त्या आहेत ज्या आमच्या ज्ञानेंद्रियांच्या आणि शास्त्रीय उपकरणांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. ना आम्ही त्या तोलू शकतो ना त्याचे मोजमाप घेऊ शकतो, माहिती प्राप्त करण्याचे कोणतेही साधन वापरून त्याच्यासंबंधी आम्हाला ती माहिती मिळू शकत नाही जिला ‘ज्ञान’ म्हणता येईल. तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञ त्यांच्या बाबतीत जेव्हा एखादे मत कायम करतात तेव्हा तो त्यांचा तर्क व अंदाज असतो. त्याला ज्ञान म्हणता येणार नाही, ही अंतिम सत्ये आहेत. या बाबतीत जे लोक युक्तिवादावर आधारित असे दृष्टिकोन मांडतात ते स्वतः त्यांच्या खरेपणाबद्दल खात्री देऊ शकत नाहीत. त्यांना त्यांच्या ज्ञानाच्या मर्यादेची जाणीव असेल तर ना ते त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतात ना इतरांना विश्वास ठेवा असे सांगू शकतात.
हेच ते क्षेत्र आहे ज्याची वास्तविकता जाणण्यासाठी माणसास सृष्टीच्या निर्मात्याने दिलेल्या ज्ञानाची गरज भासते. निर्मात्याने हे ज्ञान एखाद्या पुस्तकात छापून ते एखाद्या माणसास दिलेले नाही. त्याला हे सांगितले गेले नाही की हे वाचून या सृष्टीची व स्वतः तुझी वास्तविकता काय आहे हे जाणून घे, त्या वास्तविकतेच्या आधारावर या जगाच्या जीवनात तुझे आचरण कसे असावयास हवे ते ठरव. हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी परमेश्वराने नेहमी प्रेषितांना माध्यम बनविले. आपल्या आदेशाद्वारे (वही) त्यांना वास्तविकतेची जाणीव करून दिली आणि हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यावर त्यांची नियुक्ती केली.
प्रेषिताचे कार्य फक्त हे नाही की त्याने वस्तुस्थितीचे ज्ञान लोकापर्यंत पोहोचवावे. त्याचे कार्य हे पण आहे की त्याने लोकांना दाखवून द्यावे की या ज्ञानानुसार परमेश्वर आणि तसेच आणि माणसामाणसामध्ये वस्तुतः कोणते संबंध आहेत ?
प्रत्यक्षात हा संबंध जपण्यासाठी माणसामध्ये कोणती श्रद्धा, कशा प्रकारची भक्ती व आज्ञापालन, कोणती नीती आणि संस्कृती व सुधारणेचे कोणते नियम असावेत ? या ज्ञानानुसार समाजकारण, अर्थकारण, राजकारण, न्यायव्यवस्था, युद्ध व तह, आंतरराष्ट्रीय संबंध वगैरे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राची उभारणी कोणत्या, तत्त्वाआधारे करण्यात आली पाहिजे ? प्रेषित फक्त प्रार्थनेच्या व तिच्या विधीच्या पद्धती घेऊन येत नाही. ज्यांना सर्वसाधारण भाषेत ‘धर्म’ म्हणतात. प्रेषित तर पूर्ण जीवनपद्धती घेऊन येतो. त्याला इस्लामी परिभाषेत ‘दीन’ म्हणजे परिपूर्ण जीवनपद्धती म्हणतात.
प्रेषिताचे कार्य निव्वळ ज्ञान पोहोचविण्यापर्यंतच मर्यादित नसते. जे लोक प्रेषिताने आणलेल्या जीवनपद्धतीचा स्वीकार करतात त्यांना ती जीवनपद्धती समजावून सांगणे हे कार्य पण प्रेषितांना करावयाचे असते. त्या जीवनपद्धतीच्या श्रद्धा, नीती, प्रार्थना, कायदे आणि एकंदर संपूर्ण जीवनव्यवस्था काय आहे याचे स्पष्टीकरण त्याला करावे लागते. लोकांना त्याचे अनुकरण करता यावे म्हणून त्याने आपल्या आचरणाने एक आदर्श घालून द्यावयास हवा. लोकांना वैयक्तिक व एकत्रितरीत्या प्रशिक्षण देऊन त्यांना खर्या इस्लामी संस्कृतीसाठी प्रत्यक्षात तयार करणे, त्यांना संघटित करून त्यांचा एक असा समाज बनविणे जो परमेश्वराच्या जीवनपद्धतीची व्यवहारात प्रस्थापना करण्यासाठी प्रयत्नशील राहील. त्याच्या परिणामस्वरूप अल्लाहची वाणी प्रभावी ठरेल व इतर आवाज फिके पडतील. ही कामे प्रेषिताला करावी लागतात.
सर्व प्रेषित हे कार्य शेवटपर्यंत तडीस नेण्यास यशस्वी होतातच असे नाही. पुष्कळसे प्रेषित असे आहेत की जे आपल्या दुर्बलतेमुळे नव्हे तर पूर्वग्रहदूषित लोकांच्या अडथळ्यांमुळे आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे हे कार्य शेवटास नेऊ शकले नाहीत. परंतु सर्व प्रेषितांचे कार्य हेच होते. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे हे वैशिष्ट्य इतिहासात नमूद आहे की त्यांनी परमेश्वराची अधिसत्ता जमिनीवर त्याचप्रमाणे प्रस्थापित करून दाखविली ज्याप्रमाणे ती आकाशात आहे.
पवित्र कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सुरुवातीपासूनच आपले संबोधन सर्वासाठी खुले ठेविले आहे. लोकापैकी ज्यांनी इस्लामचा स्वीकार केला आहे, त्यांना ईमानधारक या नात्याने संबोधिले आहे. पवित्र कुरआनचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अभ्यास केल्यास आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या भाषणाचे व संभाषणाचे सर्व संग्रह पडताळून पाहिल्यास याचे समर्थन होईल. पवित्र कुरआनने किवा ते आणणार्या प्रेषित (स.) यांनी कधीही व कोठेही एखाद्या विशेष वंश, वर्ण, जात व वर्गाला किवा एखादी विशिष्ट भाषा बोलणार्या लोकांना उद्देशून सांगितलेले नाही. प्रत्येक ठिकाणी ‘आदमच्या मुलांनो’ वा ‘लोकहो’ असे संबोधन करून सार्या मानवजातीला इस्लामचा स्वीकार करण्याचे आवाहन केले गेले आहे. इस्लामचा स्वीकार केलेल्यांना आदेश व उपदेश देण्यासाठी ईमान आणलेल्या लोकांनो !’’ असे संबोधन केले गेले आहे. यावरून आपोआप ही गोष्ट स्पष्ट होते की इस्लामचे आवाहन वैश्विक आवाहन आहे आणि जो माणूस या आवाहनाचा स्वीकार करतो तो पूर्ण समान हक्कासह समान दर्जाचा विश्वासधारक-मुसलमान बनतो. कुरआन सांगतो आहे की, ‘‘विश्वासधारक एक दुसर्याचे भाऊ आहेत.’’ प्रेषित (स.) यांनी फर्माविले की, ‘‘जे लोक इस्लामचा स्वीकार करतात आणि इस्लामी जीवनाचरण पद्धती अंगिकारतात त्यांचे हक्क व जबाबदार्या आमच्यासारख्याच आहेत. ‘‘यातूनही अधिक स्पष्टपणे प्रेषित (स.) यांनी विशद केले आहे की, ‘‘ऐका तुमचा पालनकर्ताही एक आहे आणि तुमचा मूळ पुरुषही-बाप-एक आहे. कोणत्याही अरबाला अरबेतरावर प्राधान्य नाही आणि कोणत्याही अरबेतराला अरबावर प्राधान्य नाही. ना काळ्याला गोर्यावर प्राधान्य आहे, ना गोर्याला काळ्यावर. प्राधान्य आहे तर ते ईशपरायणतेच्या आधारावर. तुमच्यापैकी अल्लाहच्या दृष्टिने अधिक प्रतिष्ठित तो आहे, जो सर्वाधिक संयमी, विवेकी व सदाचारी आहे.’’
पहिले मूलभूतत्व : इस्लामी मूलभूत तत्वांपैकी सर्वात प्रमुख व महत्वाचे तत्त्व म्हणजे एका परमेश्वरावर ईमान (श्रद्धा) आणणे हे आहे. फक्त परमेश्वर आहे व तो एक आहे या गोष्टीवरच नव्हे तर तो एकटा या सृष्टीचा निर्माता, स्वामी, शासक व व्यवस्थापक आहे या वस्तुस्थितीवर देखील ईमान आणणे आवश्यक आहे. त्याच्यामुळेच ही सृष्टी अस्तित्वात आहे. आणि सृष्टीमधील प्रत्येक वस्तू अस्तित्वात ठेवण्यासाठी ज्या उपजीविकेची वा शक्तीची आवश्यकता आहे ती उपलब्ध करून देणारा अल्लाह आहे. सार्वभौमत्वाचे सर्व गुण फक्त त्याच्याच ठायी आहेत आणि याबाबतीत दुसरा कोणीही त्याचा थोडा सुद्धा भागीदार नाही.
ईशत्वाच्या सर्व गुणांनी फक्त तोच संपन्न आहे. आणि त्यापैकी कोणताही गुण इतरांजवळ नाही. सार्या सृष्टीला आणि त्यामधील प्रत्येक वस्तूला तो एका दृष्टिक्षेपात पाहतो, प्रत्यक्ष जाणतो. न केवळ वर्तमान परंतु त्याच्या भूत भविष्यालाही ! अशी ही दृष्टी व ज्ञान त्याच्याशिवाय इतर कोणास नाही. तो सदैव आहे व राहील. त्याच्या शिवाय इतर सर्व काही नाशवंत आहे. तो स्वतःहून जिवंत व अस्तित्वात आहे. न तो कोणाचीच संतती आहे, न त्याला संतती आहे. त्याच्याशिवाय या जगात जे काही आहे ते त्याची निर्मिती आहे आणि जगामध्ये सृष्टीच्या पालनकर्त्यासमान किवा त्याचा पुत्र वा कन्या म्हणता येईल अशा दर्जाचा कोणी नाही. तोच लोकांचा उपास्य आहे. उपासनेत त्याच्याबरोबर दुसर्या कोणास सहभागी करणे हा सर्वात मोठा गुन्हा व सर्वात मोठा द्रोह आहे. तोच प्रार्थना-याचना ऐकणारा आहे. त्याचा स्वीकार करणे वा न करणे हे त्याच्याच हाती आहे. त्याची प्रार्थना न करणे हा अनाठायी गर्व आहे आणि त्याच्याशिवाय इतरांसमोर हात पसरणे अज्ञान आहे. त्याच्याबरोबर इतरांचीही प्रार्थना करणे म्हणजे ईशत्वामध्ये त्याच्याबरोबर इतरांनाही सहभागी ठरविणे होय.
इस्लामच्या दृष्टीने परमेश्वराचे सार्वभौमत्व निव्वळ पारलौकिक क्षेत्रापुरते मर्यादित नाही. ते राजकीय व कायदेकानूनच्या क्षेत्रातही आहे आणि या सार्वभौमत्वामध्ये त्याचा कोणी सहभागी नाही. त्याच्या पृथ्वीत व त्याने निर्माण केलेल्या मानवजातीवर सत्ता चालविण्याचा त्याच्याशिवाय इतर कोणासही अधिकार नाही. तो एखादा बादशहा असो वा एखादे शाही घराणे असो, सत्ताधारी वर्ग असो वा लोकांची अधिसत्ता मान्य करणारी लोकशाही असो, त्याच्या मुकाबल्यात जो स्वच्छंद बनतो तो द्रोही आहे. जो त्याला सोडून इतरांचे आज्ञापालन करतो तोही द्रोही आहे. त्याचप्रमाणे द्रोही ती व्यक्ती वा ती संस्था आहे जी राजकीय व कायद्यासंबंधी सत्ता आपल्या हाती ठेवून परमेश्वराचे कार्यक्षेत्र फक्त वैयक्तिक कायदा व धार्मिक आदेश व उपदेश यापर्यंतच मर्यादित करते. वस्तुतः ईश्वराच्या भूमित निर्माण केलेल्या मानवासाठी संविधान देणारा ईश्वराशिवाय दुसरा कोणी नाही व होऊ शकत नाही. त्याच्या अधिसत्तेला आव्हान देण्याचा कोणालाही अधिकार नाही.
इस्लाम मध्ये परमेश्वरासंबंधीच्या या दृष्टिकोनामुळे काही गोष्टी स्वाभाविकपणे अपरिहार्य होतात.
फक्त एकटा परमेश्वरच मानवाचा खरा उपास्य आहे. भक्ती व आज्ञापालन फक्त एकट्या परमेश्वराची होऊ शकते. मानवाने भक्ती व आज्ञापालन करावे अशी योग्यता त्याच्याशिवाय दुसर्या कोणाची नाही.
फक्त तोच एकटा सृष्टीतील सर्व शक्तींचा अधिपती आहे आणि माणसाचे मागणे पुरे करणे त्याच्याच अधिकारात आहे. माणसाने फक्त त्याच्याजवळ याचना केली पाहिजे आणि त्याच्याशिवाय इतर कोणाजवळ याचना केली जाऊ शकते हा विचार देखील केला जाऊ नये.
तोच एकटा माणसाच्या भाग्याचा स्वामी आहे. माणसाचे भाग्य चांगले वा वाईट करण्याचे सामर्थ्य दुसर्या कोणामध्येही नाही. माणसाचे आशास्थान तोच आहे व त्याचे भय बाळगले पाहिजे. त्याच्याशिवाय इतर कोणाकडूनही आशा-अपेक्षा करू नये व त्याच्याशिवाय इतर कोणाचे भय बाळगू नये.
तोच एकटा माणसाचा व जगाचा निर्माता आहे व स्वामी आहे. माणसाची व सार्या जगाची वास्तविकता याचे प्रत्यक्ष व संपूर्ण ज्ञान फक्त त्यालाच आहे. फक्त तोच जीवनाच्या गुंता-गुंतीच्या व्यवहाहात माणसाचे योग्य मार्गदर्शन करू शकतो व योग्य आचारसंहिता देऊ शकतो.
माणसाचा निर्माता व स्वामी परमेश्वर आहे आणि तोच या जमिनीचाही ज्यावर माणूस वसतो स्वामी आहे. म्हणून माणसावर इतर कोणाची व त्याची स्वतःची सत्ता असणे हा उघड उघड ईशद्रोह आहे. त्याचप्रमाणे माणसाने स्वतः कायदे करणे किवा दुसर्या व्यक्तीच्या अगर संस्थेच्या कायदे करण्याच्या अधिकारास मान्य करणे हाही द्रोह आहे.
सर्वश्रेष्ठ सत्तेचा खरा स्वामी परमेश्वर असल्याने त्याचा कायदा हा वस्तुतः सर्वश्रेष्ठ कायदा आहे. परमेश्वराने दिलेल्या परवानगीनुसार सर्वश्रेष्ठ कायद्याच्या आधीन राहून व त्या अनुषंगाने कायदे करण्याचा अधिकार माणसाला आहे.
दुसरे मुलभूत तत्व : इस्लामचे दुसरे मुलभूत तत्व म्हणजे प्रेषितत्व आहे. पैगंबर म्हणजे ती व्यक्ती जिच्यामार्फत परमेश्वर आपला कायदा लोकांना देतो. हा कायदा आम्हाला पैगंबरांच्याकडून दोन प्रकारे प्राप्त होतो. एक, अल्लाहची वाणी जी प्रेषितांवर अवतरित होत असते, ती म्हणजे पवित्र कुरआन. दुसरी, पैगंबरांनी आपल्या अनुयायींना परमेश्वराच्या मार्गदर्शनासाठी आपल्या उक्ती, कृती व आदेशाने दिलेली शिकवण. ती म्हणजे सुन्नत (पैगंबराची आचरण पद्धती).
प्रेषितावरील श्रद्धेचे महत्व हे आहे की ही श्रद्धा नसेल तर परमेश्वरावरील ईमान हा निव्वळ एक तात्त्विक विचार बनतो. ईशभक्तीच्या श्रद्धेला एक संस्कृती, एक सभ्यता आणि एक जीवन पद्धतीचे स्वरूप देण्याचे काम पैगंबराचे वैचारिक व व्यावहारिक मार्गदर्शन करीत असते. त्याच्याचद्वारे आम्हाला कायदा प्राप्त होतो आणि या कायद्याला अभिप्रेत असलेली जीवन व्यवस्था प्रस्थापित होते आणि म्हणून एकेश्वरवादानंतर (तौहीद) प्रेषितत्वावर ईमान (श्रद्धा) आणल्याखेरीज कोणीही प्रत्यक्षात श्रद्धावंत होऊ शकत नाही.
इस्लाममध्ये प्रेषिताची योग्यता स्पष्टपणे निवेदन करण्यात आलेली आहे आणि त्यावरून प्रेषित काय आहे व काय नाही हे आम्ही चांगल्या प्रकारे समजू शकतो.
प्रेषित, लोकांना आपले नव्हे, तर परमेश्वराचे दास बनविण्यासाठी येतात. ते स्वतःला सुद्धा अल्लाहचे दास मानतात. नमाजमध्ये कमीत कमी सतरा वेळा ‘कल्म-ए-शहादत’ (साक्षवचन) म्हणण्याची शिकवण प्रेषित मुहम्मद (स.) यांनी श्रद्धावंतांना दिलेली आहे. त्या साक्षवचनामध्ये ‘‘मी साक्ष देतो की मुहम्मद हे अल्लाहचे दास व प्रेषित आहेत ‘‘या ग्वाहीचाही समावेश आहे. पैगंबर हे एक माणूस आहेत आणि ईशत्वामध्ये त्यांचा किचित देखील सहभाग नाही ही वस्तुस्थिती पवित्र कुरआनने निःसंदिग्धपणे स्पष्ट कलेली आहे. त्याचे काम संदेश पोहोचविण्याचे आहे. एखाद्याला सरळ मार्गावर आणणे किवा इन्कार करणार्यांना जाब विचारणे आणि त्यांच्यावर आपत्ती उतरविणे या गोष्टी त्यांच्या अधिकाराबाहेरील आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) हे पैगंबर आहेत. ते आपल्या अधिकारात एखाद्या गोष्टीला ‘हलाल’ (वैध) किवा एखाद्या गोष्टीला ‘हराम’ (अवैध) ठरवू शकत नाहीत. परमेश्वराच्या परवानगीशिवाय कायदे करण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यांच्यावर परमेश्वराचे जे आदेश अवतरित होतात त्यांचे पालन करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
अशा प्रकारे इस्लामने मानवाला त्या सर्व अतिरेकापासून वाचविले जे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या पैगंबराच्या अनुयायींनी त्या त्या पैगंबरांसंबंधी केले होते. कोणी त्यांना ईश्वर वा त्यासमान मानीत, कोणी त्यांना ईश्वराचा पुत्र वा अवतार समजत. अशा प्रकारच्या सर्व अतिरेकांना रद्द करून इस्लामने प्रेषिताची जी खरी योग्यता निवेदन केली आहे ती अशी -
प्रेषितांवर ईमान (श्रद्धा) आणल्याशिवाय कोणीही आज्ञाधारक होऊ शकत नाही. जो माणूस प्रेषित (स.) यांचे आज्ञापालन करतो तो वस्तुतः परमेश्वराचे आज्ञापालन करीत असतो. कारण प्रेषित यासाठीच पाठविले की त्यांचे आज्ञापालन व्हावे, मार्गदर्शन त्यालाच लाभू शकते जो प्रेषित (स.) यांचे आज्ञापालन करतो. प्रेषित (स.) जी आज्ञा देतील तिचे पालन केले पाहिजे. ते ज्यांचा प्रतिबंध करतील त्यापासून दूर राहिले पाहिजे. प्रेषित मुहम्मद (स.) यांची आचारपद्धती म्हणजे पवित्र कुरआनचे स्पष्टीकरण आणि ही आचारपद्धती पवित्र कुरआनच्या कर्त्याने म्हणजे परमेश्वराने स्वतः त्यांना शिकविली आहे. आणि म्हणून या स्पष्टीकरणाला ईश्वरी प्रमाणपत्र आहे. या स्पष्टीकरणाला दूर सारून कोणाला पवित्र कुरआनचे स्वतः स्पष्टीकरण करण्याचा अधिकार नाही. परमेश्वराने प्रेषित (स.) यांच्या जीवनाला आदर्श जीवन बनविले आहे. एखादा माणूस जोपर्यंत पैगंबराच्या निर्णयाचा स्वीकार करीत नाही तोपर्यंत तो आज्ञाधारक होऊच शकत नाही. ज्या गोष्टीचा निर्णय परमेश्वर व त्याच्या प्रेषितांनी केलेला आहे या गोष्टीबद्दल स्वतः वेगळा निर्णय घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. कोणताही प्रश्न उद्भवला तर सर्वप्रथम श्रद्धावंतांनी त्या बाबतीत परमेश्वर व त्याचा प्रेषित यांचा निर्णय काय आहे हे पाहिले पाहिजे.
वरील विवेचनवरून ही गोष्ट स्पष्ट होते की, परमेश्वराने प्रेषित (स.) यांच्या मार्फत माणसाला फक्त एक श्रेष्ठ कायदा दिलेला नसून चिरकालीन मूल्येही दिलेली आहेत. पवित्र कुरआन व सुन्नतमध्ये ज्याला चांगले (खैर) ठरविले गेले आहे ते सदैव चांगले आहे आणि ज्याला वाईट (शर) ठरविले गेले आहे ते सदैव वाईट आहे. ज्याला कर्तव्य ठरविले गेले आहे ते सदैव कर्तव्य आहे. ज्याला हलाल (वैध) ठरविले गेले आहे ते सदैव हलाल आहे आणि ज्या गोष्टीला हराम (अवैध) ठरविले गेले आहे ती गोष्ट सदैव हराम आहे. या कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती, फेरफार करण्याचा किवा तो रद्द करण्याचा अधिकार कोणास नाही. श्रद्धावंत जोपर्यंत श्रद्धावंत आहे तोपर्यंत हे शक्य नाही की त्याच्यासाठी काल जे वाईट होते ते आज चांगले ठरावे आणि परत वाईट ठरावे. कोणतेही अनुमान कोणताही निष्कर्ष (इज्तिहाद) व एकमत (इज्मा) अशाप्रकारच्या फेरफारास समर्थ नाहीत.
तिसरे मूलभूत तत्व : इस्लाममध्ये तिसरे मूलभूत तत्त्व ‘आखिरत’ (परलोक) आहे. याचे महत्त्व हे आहे की याचा इन्कार करणारा नास्तिक बनतो. आणि परमेश्वर, प्रेषित आणि पवित्र कुरआन यांना मानणे देखील त्याला नास्तिकतेपासून वाचवू शकत नाहीत. ‘आखिरत’ वरील ईमान (श्रद्धा) खालील सहा घटकांवर आधारलेले आहे.
जगामध्ये माणसाला बेजबाबदार बनवून सोडून देण्यात आलेले नाही. माणसाला त्याच्या निर्मात्यासमोर जाब द्यावयाचा आहे. जगातील हे जीवन त्याची परीक्षा व चाचणी घेण्यासाठी आहे. या जगाच्या समाप्तीनंतर माणसाला आपल्या जीवनकृत्यांचा हिशेब आपल्या निर्मात्या परमेश्वरासमोर द्यावयाचा आहे.
या हिशेबासाठी परमेश्वराने एक वेळ निश्चित केलेली आहे. परमेश्वराने मानवजातीसाठी या जगात कार्य करण्यासाठी जी कालमर्यादा ठरविली आहे ती समाप्त होताच कियामत (जगाचा शेवट) होईल. जगाची प्रचलित व्यवस्था विस्कटली जाईल आणि एक दुसरी जागतिक व्यवस्था नव्या पद्धतीने अस्तित्वात येईल. त्या नव्या जगात या जगातील सुरूवातीपासून शेवटपर्यंत जन्मास आलेल्या सर्व माणसांना पुन्हा जिवंत केले जाईल.
त्यावेळी त्या सर्वांना अल्लाहच्या न्यायालयासमोर हजर केले जाईल आणि प्रत्येकाला आपापल्या वैयक्तिक कृत्याबद्दल जाब द्यावा लागेल.
तेथे परमेश्वर निव्वळ आपल्या ज्ञानाच्या आधारावर निर्णय देणार नाही तर न्यायाच्या सर्व अटी पुर्या केल्या जातील. प्रत्येक व्यक्तीच्या जीवन कृत्यांचा पुरा अहवाल न्यायालयासमोर ठेवला जाईल. माणसाने उघडपणे व गुप्तपणे काय काय केले आणि कोणत्या हेतूने केले या संबंधीचा निरनिराळ्या प्रकारचा साक्षीपुरावा न्यायालयासमोर सादर केला जाईल.
अल्लाहच्या न्यायालयासमोर कोणत्याही प्रकारची लाचलुचपत, कोणती अनुचित शिफारस व सत्याविरोधी वकिली चालणार नाही. एकाचा भार दुसर्यावर जाणार नाही. अत्यंत निकटचा नातलग अगर दोस्त पुढारी वा धार्मिक नेता अथवा या कपोलकल्पित देवीदेवता कोणाच्याही मदतीसाठी पुढे सरसावणार नाहीत. माणूस तेथे एकटा, निराधार असेल व त्याला आपला जाब द्यावा लागेल. तिथे निर्णय फक्त परमेश्वराच्या अधिकारात असेल.
माणसाने जगामध्ये प्रेषितांनी दाखवून दिलेल्या सत्याचा स्वीकार करून आणि आखिरतच्या उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून योग्य प्रकारे अल्लाहचे आज्ञापालन केले किवा नाही, या गोष्टीवर निर्णय अवलंबून असेल. त्याने तसे आज्ञापालन केले असल्यास त्याला निरंतरचे सुख व समाधान (जन्नत) लाभेल आणि त्याने तसे केले नसल्यास त्याला निरंतरचे दुःख व यातना (दोजख) भोगाव्या लागतील.
पहिल्या प्रकारचे लोक : आखिरतवरील ही श्रद्धा तीन प्रकारच्या लोकांच्या जीवन पद्धतींना एक-दुसर्यापासून अगदी अलग करते. लोकांमधील एक प्रकार असा आहे की, जे आखिरतवर (परलोक) विश्वास ठेवीत नाहीत. या जगातील जीवनालाच जीवन समजतात आणि म्हणून चांगल्या व वाईट आचरणाच्या फक्त त्या परिणामांनाच ते जाणू शकतात जे या जगामध्ये प्रकट होतात. त्यांच्या दृष्टीने ज्या आचरणाचा परिणाम या जगात चांगला व फायदेशीर ठरेल ते आचरण चांगले आहे. ज्याचा परिणाम वाईट व नुकसानकारक होतो ते त्यांच्या दृष्टीने वाईट आहे. इतकेच नव्हे तर परिणामाच्या दृष्टीने एखादी गोष्ट एखाद्या वेळेस चांगली ठरते तर तीच गोष्ट दुसर्या वेळी वाईट ठरते.
दुसर्या प्रकारचे लोक : दुसर्या प्रकारचे लोक आखिरतवर (परलोक) विश्वास तर ठेवतात, परंतु त्यांना असा भरवसा असतो की कोणा न कोणाची शिफारस त्यांना अल्लाहच्या न्यायालयात वाचवू शकेल. कोणी न कोणी त्यांच्या अपराधाबद्दल प्रायश्चित घेतलेले असेल वा मोबदला दिलेला असेल. ते परमेश्वराचे आवडते असल्यामुळे त्यांना मोठयात मोठ्या अपराधाची शिक्षा मिळाली तरी ती नावापुरती असेल. ही गोष्ट आखिरतवरील (परलोक) श्रद्धेच्या सर्व फायद्यांना नाहीशी करते आणि दुसर्या प्रकारच्या लोकांना पहिल्या प्रकारच्या लोकांच्या पंक्तीत नेऊन बसविते.
तिसर्या प्रकारचे लोक : तिसर्या प्रकारचे लोक आखिरतच्या (परलोक) तत्त्वाला अगदी त्या स्वरूपात मानतात ज्या स्वरूपात त्याला इस्लामने सादर केलेले आहे. ते प्रायश्चित्त, अनुचित शिफारस किवा परमेश्वराबरोबरचे विशिष्ट संबंध वगैरे भ्रामक समजुतींच्या आहारी गेलेले नसतात. त्यांच्यासाठी ही श्रद्धा म्हणजे एक मोठे नैतिक सामर्थ्य आहे. त्या माणसाच्या मनात आखिरतबद्दलची (परलोक) खात्री योग्य स्वरूपात रुजलेली असते. त्याची स्थिती अशी असते की त्याच्या बरोबर नेहमी एक संरक्षक असतो. तो वाईटाच्या प्रत्येक इच्छेच्या वेळी त्याला सावध करीत असतो. प्रत्येक कृतीच्या वेळी त्याला प्रतिबंध करीत असतो आणि वाईट आचरणाबद्दल त्याची निर्भत्सना करीत असतो. बाहेर पकडणारे पोलिस, साक्ष देणारा साक्षीदार, शिक्षा देणारे न्यायालय, निर्भत्सना करणारे लोकमत असो वा नसो, त्याच्यासाठी त्याला सदैव सावध ठेवणारा संरक्षक असतो. त्याच्या भयाने माणूस जंगलात असो वा अंधारात, ओसाड जागेत असो वा एकान्तात, तो परमेश्वराने त्याच्यावर टाकलेल्या जबाबदार्यांपासून विन्मुख होण्याचे आणि परमेश्वराने हराम ठरविलेल्या गोष्टींना करण्याचे धाडस करीत नाही. यदाकदाचित चुकून त्याच्या हातून असे घडले तर त्याला त्याबद्दल लाज वाटेल व तो पश्चाताप करील. याहून अधिक चांगले, माणसाची नैतिक सुधारणा करणारे व त्याला चारित्र्यवान बनविणारे दुसरे साधन नाही. परमेश्वराचा श्रेष्ठ कायदा चिरंतन मूल्ये माणसाला देतो. त्याबरूहूकूम निर्धाराने आचरण करीत राहणे आणि कोणत्याही परिस्थितीत त्यापासून परावृत्त न होणे आखिरतच्या (परलोक) श्रद्धेवर अवलंबून आहे. इस्लाममध्ये याला इतके महत्व दिले गेले आहे की ही श्रद्धा नसेल तर परमेश्वरावरील व प्रेषितावरील श्रद्धा सुद्धा निरर्थक ठरते.
वर स्पष्ट केल्याप्रमाणे, इस्लाम एक संपूर्ण संस्कृती, एक परिपूर्ण सभ्यता आणि एक सर्वव्यापी जीवन पद्धती आहे. इस्लाम मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नैतिक मार्गदर्शन करतो. इस्लामची नीती संसारत्यागी, वैरागी, संन्यासी लोकांच्यासाठी नाही तर, ती अशा लोकांसाठी आहे जे जीवनाची निरनिराळी क्षेत्रे चालवितात, व प्रत्यक्ष त्यामध्ये कार्य करतात. लोक नैतिकतेची उच्चता ही आश्रम, मठ, विहार व खानकाहमध्ये शोधीत होते. इस्लाम त्यांना जीवनाच्या ऐन प्रवाहात आणू इच्छितो. त्याचा इरादा हा आहे की राज्याचे शासक, प्रदेशांचे राज्यपाल, न्यायालयांचे न्यायाधीश, पोलिस व सैन्याचे अधिकारी, पार्लमेंटचे सभासद, उद्योगपती व निरनिराळे व्यवसाय चालक, अध्यापक व विद्यार्थी, आई-बाप, मुले-मुली, पती-पत्नी, शेजारी वगैर सर्वजण या नीतिमत्तेने अलंकृत असावेत. इस्लामची इच्छा आहे की प्रत्येक घरात ही नीतिमत्ता जोपासली जावी आणि प्रत्येक मोहल्ल्यात, पेठेत व बाजारात सुद्धा तिचेच चलन असावे. प्रत्येक व्यावसायिक क्षेत्रात आणि शासनाच्या सार्या विभागात तिचेच पालन केले जावे आणि राजकारण सत्य व न्यायावर आधारित असावे. निरनिराळ्या समाजांनी परस्परांबद्दल आदर बाळगून व सत्याचा अंगिकार करून व्यवहार करावा. युद्ध झाले तरी त्यामध्ये सौजन्य व सभ्यता पाळली जावी. पशूतुल्य आचरण नसावे. माणसाच्या ठायी जेव्हा ईश्वराचे भय निर्माण होईल. ईश्वराच्या कायद्याला जेव्हा तो सर्वश्रेष्ठ कायदा मानेल, परमेश्वरासमोर आपल्याला जाब द्यायचा आहे याची जाणीव ठेवून जेव्हा तो चिरकालीन मूल्यांचे पालन करील तेव्हा त्याचे हे आचरण प्रार्थनागृहापर्यंतच मर्यादित राहात नाही. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तो काम करीत असेल त्या सर्व क्षेत्रात तो परमेश्वराच्या प्रामाणिक व एकनिष्ठ दासाप्रमाणे काम करीत राहातो.
![]() ![]() | ||
नमस्कार, Imtiyaz Shaikh
मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत. पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल. मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर. कळावे - खबर्या (विकीपत्रिका) |